विजय लोकशाहीचा परंतु व्यथा विचारसरणीची
"मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही". या उक्तीला पुरेपूर जागणारे, मराठा साम्राज्याचे आराध्या दैवत, क्ष्यत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता त्यांनी जिंकलेल्या गड - किल्ल्यातून निर्माण करतात.
हे फक्त दगड मातीने उभारलेले किल्ले नसून यातून माझ्या राज्याची ओळख तयार होते, महाराष्ट्राचं अस्तित्व निर्माण करण्याचं श्रेय जितकं छत्रपतींना जात त्यांच्या मावळ्यांच्या सांडलेल्या रक्ताला दिलं जात, तितकाच श्रेयाचा वाटा या गड - किल्ल्यांचा आहे. आणि आज हे सरकार या अस्मितेला भाडेतत्त्वावर देण्याची भाषा करतात, जीभ तरी कशी धजावते या राजकारन्यांची हा विचार बोलताना. या एतीहासिक वास्तूच्या एक एक बुरुज दरवाजा स्वराज्य रक्षक मावळ्यांच्या रक्ताने रंगलाय, त्याच जतन करायचा विचार सोडून सरकार त्या वास्तूला पैसा कमावण्यासाठी साधन बनवू पाहतेय हे कदापि सहन होऊ शकणार नाही.
महाराष्ट्राच्या इतिहासाला कागदी पैस्यांच्या किमतीत मोजू पाहणारे सरकार आज लोकशाही ची ताकत अनुभवेल, आज माझी लोकशाही जिंकेल, आज पुन्हा ती वेळ येते हे बोलायची की 'सरकारच डोकं ठिकाणावर आहे काय ?'
हा निर्णय जनतेचा रोष ओढवून घेईल याची जाणीव सरकारला असायला हवी होती !
आज महाराष्ट्राच्या जनतेने प्रखर विरोध करत हा निर्णय थांबवला खरं परंतु या सगळ्या घटनेतून एक बाब लक्षात येते की माझ्या युवा पिढीला पेटवण्यासाठी धार्मिक - जातीवादी विषयच का लागतात ? सरकारच्या बाकी काही निर्णयांवर आमची पिढी त्यांचं मत का मांडत नाही? का त्या प्रत्येक निर्णयच विश्लेषण करून पाहत नाही जे धार्मिक अथवा जातीवादी जरी नसले तरी ते भारतीय लोकशाहीला तडा जाऊ देणारे असतात ? उदाहणादाखल; माहितीचा अधिकार कायदा भारत सरकारने सुधारित केला आणि नकळतपणे त्या कायद्याचा भक्कम पाया भुसभुशीत केला, त्या अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या हाताची कटपुटली करून सोडलं. नावरुपी राहिलेला माहितीचा अधिकार कायदा यावर विश्वास ठेवावा कसा हा प्रश्न आहे .
आज आम्ही राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या निर्णयाची चौकशी हमखास करू पण लोकशाहीला बळकटी देणारे कायदे बुजरे केले जात आहेत याकडे मात्र आमचं दुर्लक्ष ! खरतर माझ्या राष्ट्राला जातीधर्माच्या विविधतेच्या जाळ्या ने इतकं जखडल आहे की आज काळाची गरज असलेली लोकशाही बळकट करणे आपले आद्यकर्तव्य असले पाहिले हे माझ्या युवा पिढीला समजत नाही.
आज कळकळीने सांगावस वाटत की संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, एकात्मता आणि मुख्य म्हणजे धर्मनिरपेक्षता या तत्तवानुसार जगून बघा. माणुसकीच्या धर्माने प्रत्येक भारतीय जर राष्ट्राच्या उद्घराकराता कष्ट करेल तर महासत्ता होण्याची वाटचाल याच मार्गाने होऊ शकते यात काही गैर नाही. आता वेळ आलीय जातपात धर्म वंश या जाळ्यातून स्वप्रयत्नांनी मुक्त होऊन संवैधानिक विचारसरणी जोपासण्याची. हाच खरा मार्ग आहे विकासाची स्वप्न साकारण्याचा.
जय भारत🇮🇳
✍️Future of Tommorow India.
"मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही". या उक्तीला पुरेपूर जागणारे, मराठा साम्राज्याचे आराध्या दैवत, क्ष्यत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता त्यांनी जिंकलेल्या गड - किल्ल्यातून निर्माण करतात.
हे फक्त दगड मातीने उभारलेले किल्ले नसून यातून माझ्या राज्याची ओळख तयार होते, महाराष्ट्राचं अस्तित्व निर्माण करण्याचं श्रेय जितकं छत्रपतींना जात त्यांच्या मावळ्यांच्या सांडलेल्या रक्ताला दिलं जात, तितकाच श्रेयाचा वाटा या गड - किल्ल्यांचा आहे. आणि आज हे सरकार या अस्मितेला भाडेतत्त्वावर देण्याची भाषा करतात, जीभ तरी कशी धजावते या राजकारन्यांची हा विचार बोलताना. या एतीहासिक वास्तूच्या एक एक बुरुज दरवाजा स्वराज्य रक्षक मावळ्यांच्या रक्ताने रंगलाय, त्याच जतन करायचा विचार सोडून सरकार त्या वास्तूला पैसा कमावण्यासाठी साधन बनवू पाहतेय हे कदापि सहन होऊ शकणार नाही.
महाराष्ट्राच्या इतिहासाला कागदी पैस्यांच्या किमतीत मोजू पाहणारे सरकार आज लोकशाही ची ताकत अनुभवेल, आज माझी लोकशाही जिंकेल, आज पुन्हा ती वेळ येते हे बोलायची की 'सरकारच डोकं ठिकाणावर आहे काय ?'
हा निर्णय जनतेचा रोष ओढवून घेईल याची जाणीव सरकारला असायला हवी होती !
आज महाराष्ट्राच्या जनतेने प्रखर विरोध करत हा निर्णय थांबवला खरं परंतु या सगळ्या घटनेतून एक बाब लक्षात येते की माझ्या युवा पिढीला पेटवण्यासाठी धार्मिक - जातीवादी विषयच का लागतात ? सरकारच्या बाकी काही निर्णयांवर आमची पिढी त्यांचं मत का मांडत नाही? का त्या प्रत्येक निर्णयच विश्लेषण करून पाहत नाही जे धार्मिक अथवा जातीवादी जरी नसले तरी ते भारतीय लोकशाहीला तडा जाऊ देणारे असतात ? उदाहणादाखल; माहितीचा अधिकार कायदा भारत सरकारने सुधारित केला आणि नकळतपणे त्या कायद्याचा भक्कम पाया भुसभुशीत केला, त्या अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या हाताची कटपुटली करून सोडलं. नावरुपी राहिलेला माहितीचा अधिकार कायदा यावर विश्वास ठेवावा कसा हा प्रश्न आहे .
आज आम्ही राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या निर्णयाची चौकशी हमखास करू पण लोकशाहीला बळकटी देणारे कायदे बुजरे केले जात आहेत याकडे मात्र आमचं दुर्लक्ष ! खरतर माझ्या राष्ट्राला जातीधर्माच्या विविधतेच्या जाळ्या ने इतकं जखडल आहे की आज काळाची गरज असलेली लोकशाही बळकट करणे आपले आद्यकर्तव्य असले पाहिले हे माझ्या युवा पिढीला समजत नाही.
आज कळकळीने सांगावस वाटत की संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, एकात्मता आणि मुख्य म्हणजे धर्मनिरपेक्षता या तत्तवानुसार जगून बघा. माणुसकीच्या धर्माने प्रत्येक भारतीय जर राष्ट्राच्या उद्घराकराता कष्ट करेल तर महासत्ता होण्याची वाटचाल याच मार्गाने होऊ शकते यात काही गैर नाही. आता वेळ आलीय जातपात धर्म वंश या जाळ्यातून स्वप्रयत्नांनी मुक्त होऊन संवैधानिक विचारसरणी जोपासण्याची. हाच खरा मार्ग आहे विकासाची स्वप्न साकारण्याचा.
जय भारत🇮🇳
✍️Future of Tommorow India.